“श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

प्रदीप झणझणे यांचा कामगारांच्या मागणीला जाहीर पाठिंबा

फलटण : कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रजा गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाने संवेदनशील भूमिका घेत कारखान्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही प्रजा गटाच्या वतीने करण्यात आली.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, त्याची सर्वाधिक झळ मात्र सामान्य कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एका बाजूला आरोप-प्रत्यारोप, बैठका आणि राजकीय भूमिका यांची चर्चा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला रोजच्या मजुरीवर संसार चालवणाऱ्या सहाशे ते सातशे कामगारांच्या घरातील चूल पेटवण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.

कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांचे नियमित उत्पन्न थांबले असून, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. काही कुटुंबांवर तर आर्थिक संकट इतके गडद झाले आहे की उद्याचा दिवस कसा जाईल, याचीही चिंता त्यांना सतावत असल्याचे प्रजा गटाच्या वतीने कामगारांच्या भावना प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केल्या.

कारखाना हा केवळ उद्योग नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ राजकीय दृष्टीकोनातून न पाहता मानवी संवेदनांच्या दृष्टीने पाहण्याची गरज फलटणकर जनतेतून व्यक्त होत आहे. कारखान्यावरील स्थगिती लवकर उठवून तो पुन्हा सुरू झाल्यास शेकडो कामगारांच्या घरातील चूल पुन्हा पेटू शकेल आणि स्थानिक अर्थचक्रालाही नवसंजीवनी मिळू शकेल, अशी अपेक्षा कामगार आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती प्रदीप झणझणे यांनी दिली.

आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यापैकी कोण पुढाकार घेऊन श्रीराम कारखाना आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार आहे की नाही, याची उत्सुकता फलटणकर जनतेमध्ये वाढली आहे.

  • Related Posts

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    युवासेना तालुका प्रमुखपदासाठी अजय सूळ यांचे नाव चर्चेत

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    “श्रीराम” चं राजकारण नको, कामगार व जनतेचं हित पहा – प्रजा गट

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    तासगाव–कवठेमहांकाळमध्ये अभयसिंह जगतापांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मविआचा विक्रमी विजयाचा निर्धार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    “आधी पालकमंत्री की पोस्टमन ते ठरवा!” – खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जयकुमार गोरेंवर पलटवार

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    शेतकऱ्यांच्या हाकेला धावला प्रजा गट; प्रदीप झणझणे यांचं दमदार कार्य

    “भाजपविरोधात अभयसिंहांचा हल्लाबोल; ‘अन्यायी प्रवृत्तीविरोधात माझी स्वाभिमानाची लढाई!'”

    “भाजपविरोधात अभयसिंहांचा हल्लाबोल; ‘अन्यायी प्रवृत्तीविरोधात माझी स्वाभिमानाची लढाई!'”
    error: Content is protected !!