सातारा, ११ सप्टेंबर :
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने “मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ग्रामीण विकास व पंचायत राज क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत सुरवडी व सौ. शरयू जितेन्द्र साळुंखे-पाटील ( सरपंच, ग्रामपंचायत सुरवड़ी) यांना सन्मानित करण्यात आले. सुरवडी ग्रामपंचायतीचा सन्मान स्वीकारताना ग्रामसेवक शशिकांत माने हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात मा. ना. जयकुमार गोरे (मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य), मा. ना. शंभुराज देसाई ( पालक मंत्री, सातारा जिल्हा), आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. याशनी नागराजन, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (IAS), जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच ग्रामविकासाशी निगडित अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील विकासात्मक उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.









